लोकसेवा - समाजसेवा
- अनुराधा भोसले यांनी मुंबईत ‘निर्मला निकेतन’मध्ये समाजकार्याची पदवी मिळवली आणि पुणे, जळगाव, छत्रपती संभाजीगर येथे नोकरी केली.
- ठाण्यातील ‘श्रमजीवी संस्थेच्या कामापासूनच प्रेरणा घेऊन बालकांसाठी अवनी संस्था सुरू केली. संस्थेत ५० मुलींना शिक्षणाबरोबरच जीवनकौशल्ये शिकवली जातात.
- संघर्षाशिवाय तरणोपाय नाही हे लक्षात घेऊन ‘अवनी’ अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात वंचित, निराधार मुलांसाठी शिक्षणाची द्वारे खुली केली.
- आतापर्यंत ८६ हजार मुलांसाठी शिक्षणाची पायवाट तयार केली. वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी ५७ वीटभट्टी शाळा सुरू केल्या.
- एकल स्त्रियांसाठी ‘एकटी’ संस्था सुरू करून त्यांना आत्मसन्मान मिळवून दिला.
- ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’, ‘रंकाळा बचाओ’, ‘महिला संघर्ष’ चळवळीत कार्यरत आहेत.
- महिलांच्या हक्कासाठी केलेल्या चळवळीमुळे विधवा, परित्यक्तांना अशा ४ हजार महिलांना निवृत्तीवेतन सुरू झाले.
- राज्य शासनाचा ‘अहल्यादेवी होळकर’ पुरस्कार
- ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये अमिताभ बच्चन यांनी अनुराधा यांना सहभागी करून ‘अवनी’चे कार्य सर्वदूर पोहोचवले.
- अभिजित सोनावणे म्हणजे पुण्यातील एक अवलिया. डॉ. सोनावणे (बीएएमएस) यांची ओळख केवळ ‘डॉक्टर’ म्हणून नाही तर ‘भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर’ अशी झालेली आहे.
- भीक मागणाऱ्या आजी, आजोबा आणि त्यांच्या मुला-मुलींचं पुनर्वसन करण्याचा त्यांनी ध्यास घेतला आहे. गेल्या आठ वर्षांपासून डॉ. सोनावणे हे भिकाऱ्यांपर्यंत मोफत औषधोपचार पोहोचवण्याचे काम करत आहेत.
- डॉक्टरांनी रस्त्यावर भीक मागणाऱ्या २९० लोकांना छोटे छोटे व्यवसाय सुरू करून देऊन स्वयंपूर्ण केले आहे. आज ते "भिक्षेकरी" म्हणून नाही तर सन्मानाने "गावकरी" म्हणून जगत आहेत.
- डॉ अभिजीत सोनवणे यांना डॉक्टर झाल्यानंतर त्यांच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये एका भीक मागणाऱ्या आजोबांनी मदत केली होती. या मदतीमधून उतराई होण्यासाठी आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी म्हणून डॉ अभिजीत सोनवणे यांनी आंतरराष्ट्रीय संस्थेतील पाच लाख उत्पन्नाची नोकरी सोडून हे काम २०१५ पासून सुरू केले आहे.
- एकावेळी शंभर वृद्ध भिक्षेकरी येऊन एखाद्या भागाची स्वच्छता करतात हा सुद्धा जगातला पहिला प्रकल्प असेल. स्वच्छता टीममधील हे शंभर वृद्ध भिक्षेकरी पंतप्रधानांनी राबविलेल्या स्वच्छता अभियानाचे पुणे जिल्ह्याचे ब्रँड अँबेसिडर आहेत.
- उसतोड, गरिबीच्या संघर्षातूनही संतोष यांनी बालग्राम परिवार आणि युवाग्राम प्रकल्प उभे केले. संस्थेच्या माध्यमातून तीन मुख्य सामाजिक प्रकल्प चालवले जातात.
- ६ ते १८ वयोगटातील अनाथ बालकांसाठी (सहारा) बालग्राम परिवार, छत्रपती संभाजीनगर येथील शरणापूर येथे १८ वर्षांपुढील निराधार, निराश्रित युवक- युवतींसाठी युवाग्राम प्रकल्प आणि शेतीवर आधारित कृषीग्राम प्रकल्प ही येथे चालवला जातो.
- सध्या या संस्थेत ११७ मुले, मुली वेगवेगळ्या शाखेत अंगणवाडी ते पदवीपर्यंत शिक्षण घेत आहे.
- बालग्राममध्ये मोठी झालेली १२ मुले खाजगी आणि शासकीय सेवेत कार्यरत आहेत. १६ मुले युवाग्रामच्या माध्यमातून कला, अभियांत्रिकी, वैद्यकीय शाखेत उच्च शिक्षण घेत आहेत.
- यवतमाळ येथील कायद्याचा अभ्यास करणाऱ्या प्रीती आणि संतोष यांचा २०११ मध्ये १५० रुपयांमध्ये नोंदणी पद्धतीने विवाह झाला.
- विवाहानंतर प्रीती यांनीही बालग्रामच्या कामात झोकून दिले. आज त्या ११७ अनाथ मुलांच्या आई झाल्या आहेत.
- राज्यातील १०० संस्थांना सोबत घेत युनिसेफ, सेव्ह दी चिल्ड्रेन, क्राय यांच्या सहभागाने २००२ साली बाल हक्क अभियान फोरमची स्थापना केली. २००५ साली मुलांसोबत काम करणाऱ्या ५५ संस्थाना सोबत घेऊन बाल हक्क संरक्षण समिती राज्यस्तरीय फोरमची स्थापना केली.
- पुण्याच्या यशदा मध्ये सल्लागार म्हणून काम करताना बाल हक्क विभाग सुरु केला. DFID या संस्थेच्या प्रकल्पाद्वारे २०,००० पेक्षा अधिक बाल कामगारांची सुटका करून शिक्षणाच्या प्रवाहाशी जोडले.
- पहिल्या बाल हक्क संरक्षण आयोगावर ३ वर्षे सदस्य म्हणून काम केले आहे. राज्यस्तरावरील सर्वात आधी शिक्षण फोरमतर्फे राज्यात वंचित मुलांचे शिक्षणाचा प्रश्न विषयावर कार्यशाळा घेतल्या. तर, शेतात काम करणाऱ्या मुलांसाठी ५० गावात रात्र शाळा सुरु केल्या.
- गेल्या ४० वर्षापासून महिला विकासासाठी १५०० बचत गट स्थापन करून अंदाजे १७००० महिलांचे संगठन केले. ३००० महिला शेतकऱ्यांसाठी शेती आधारित उद्योग विषयी प्रशिक्षण आणि उद्योग उभारणीसाठी मदत.
- ६५०० किशोरवयीन मुलींना आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता, व्यक्तिमत्व विकास, करियर मार्गदर्शन, सेल्फ डिफेन्स, माइंडफुलनेस असे विविध विषयावर प्रशिक्षण.
- सोळा वर्षावरील सर्व प्रकारच्या दिव्यांग,अनाथ, ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांसाठी देशातील पहिले निवासी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, उच्च शिक्षण , तंत्रज्ञान प्रशिक्षण देणारा प्रकल्प जळगाव व पुणे येथे सुरू केला.
- प्रकल्पात भारतातील १८ राज्यातील ५०० विद्यार्थी निवासी शिक्षण प्रशिक्षण घेतात. त्यातून शेकडो दिव्यांग, अनाथ विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी, इंजिनियर, डॉक्टर बँक अधिकारी, शिक्षक पदांवर कार्यरत आहेत.
- २००६ पासून राज्यातील हजारो आदिवासी, ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना विनामूल्य स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण दिले. त्यातील १२०० हुन अधिक विद्यार्थी प्रशासनात विविध पदांवर कार्यरत आहेत.
- दिव्यांग, अनाथ, ट्रांसजेंडर आदिवासी, ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी देशातील पहिल्या इन्क्लुझिव्ह व ॲक्सेसिबल प्रकल्पाची जळगाव येथे लोकसहभागातून निर्मिती केली. यासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते २०२३ साली राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.